एक आधारवड – सौ. प्रतिभा केंजळे मॅडम व केंजळे सर

संस्कार प्रतिष्ठान

मतिमंद मुलाची निवासी शाळा, पिरंगुट- अंडवेट

सामाजिक क्षेत्रात खूप मोठी मोठी माणसे काम करत आहेत. आणि सामाजिक दायित्व निभावत आहे त्या मध्ये प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ, अभय बंग, मोहन धारिया, अण्णा हजारे, पोपटराव पवार, मेधा पाटकर, विनोबा भावे, कै. गोविंद पानसरे डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रतिभा केंजळ व ईतर ही खूप महत्वाच्या व्यक्तीनी आपले योगदान या क्षेत्रात दिले त्यांच्या शिवाय हा सूज्ञ समाज निर्माण होऊ शकल्या नसता. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आणि क्षेत्र ही आगदी वेगळे पण प्रामाणिक पणे समजाची सेवा हा मुख्य उद्देश या सर्वांपुढे आहे आणि असतो या सर्वांना कोठून ऐवडी शमता आणि उत्साह मिळतो हे समजत नाही हे कबूल केले पाहिजे.. कदाचित या सारखी व्यक्ती देवच वाटते.

    मी या सर्व व्यक्ती च्यां बद्दल काय काय लिहावे असे होते पण माझा अभ्यास निच्छित कमीच पडेल हे मात्र नक्की पण म्हणून मी माझ्या समोर असणाऱ्या आणि त्यांचा प्रवास काही वर्ष तरी मी पाहिलं अश्या केंजळे परिवार विषयी लिहण्याची ठरवले त्या साठी 2013 सालच्या लोकमत मधील लेखाचा असरा घ्यावा लागला परंतु त्या ही पलीकडले म्हणजे त्यांना मी प्रत्यक्ष पाहिले असल्याने मला त्यांच्या त्याग आणि अपार कष्ट डोळ्या समोर उभे राहते म्हणून हा लेख लिहण्यासाठी घेतला.   

        केंजळेसर परिवार पिरंगुट मध्ये राहण्यास आले सर शिक्षक होते. त्यामुळे ते आले असावेत त्यावेळी शिक्षक हे ज्या शाळेत शिकवत त्या भागात राहत असे. त्या कारणाने ते स्थाईक झाले असे म्हणण्यास काही हरकत नाही. त्यांना एक मतिमंद मुलगा होता. त्याच्या शिक्षणासाठी परत पुण्यात जाणे शक्य नव्हते आणि पुण्यात  फक्त 'कामायनी' शाळा होती. जी मतिमंद मुलांना शिकवत होती. पण हा रोजचा प्रवास शक्य नव्हतं आणि त्या वेळी प्रवास करण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा सरकारी एस. टी. हे वाहन येत असे, खाजगी वाहनांचा प्रश्नच नव्हता. त्या मुळे मुलाला घरी शिकवणे हा एकाच मार्ग त्यांच्या कडे होता. या एका कारणाने मॅडम च्या मनात आले कि या ग्रामीण भागासाठी मतिमंद मुलांसाठी शाळा का सुरु करू नये. सौ. केंजळे मॅडम यांनी त्यांच्या लेखात सांगितले आहे.

       १९८४ सली सुरू झाली मतिमंद मुलाची निवासी शाळा. ठिकाण राहते घर त्या वर्षी पाच विद्यार्थी यांनी प्रवेश केला पण घर गावात असल्याने शेजारी व गावातील परिवार यांना त्रास होणार ! कारण मुले मतिमंद..! त्याना संभाळने .. त्यांचा गोंधळ..!  कोणाला त्रास होऊ नये या कारणाने. जवळच्या माळावर शाळा स्थलांतरित करावी असे ठरवले आणि जागा शोधून शाळा तिकडे हलवली जागा जिथे मिळाली तेथे जवळपास कोणी नाही मोकळे रान जाण्यायेण्या साठी सरकारी पांधन ती ही पावसात पूर्ण बंद असे. असले तरी मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू करणे हे एकमेव ध्येय आलेल्या केंजळे परिवाराने जागा घेऊन शाळा सुरू झाली.   

        शाळा तर सुरू झाली एक खोली एक छोटे शेड. मुलांना सांभाळण्यासाठी गावच्या जवळील काही मंडळी. अधिकचे विद्यार्थी ही प्रवेशासाठी येत होते. कोणाला नाही कसे म्हणावे हा प्रश्न मॅडम ला नक्की पडला असेल त्या आर्थिक बाजू आणि हे मोठे होत असलेले कुटुंब  सगळे सांभाळणे अवघड होत होते कारण आणि उत्पन्नाचे साधन म्हणजे केंजळे सरां ची नोकरी त्यावर तर सगळे चाले पण विद्यार्थी मतिमंद आणि रहिवाशी शाळा त्यामुळे जबाबदारी मोठी होती. त्या कारणाने सरांनी नोकरी सोडून पूर्ण लक्ष शाळेत घातले पण मॅडम शाळेचे सर्व पाहत असल्याने सरांनी शाळेसाठी परवानगी आणि निधी मिळवणे ही जबाबदारी स्वीकारली. मुलांकडे लक्ष देणे आणि त्यांना शिकवणे हे कार्य अखंड पणे दोन्ही उभयतांनी स्वीकारली.

       मतिमंद मुले असल्याने शाळा सोडून रात्री आपरात्री पळून जात त्या मुळे रात्र-रात्र धावपळ करून मुलांना शोधणे आणि शाळेत असणाऱ्या मुलांना राखून ठेवणे हे काम निरंतर चाले मुलाची सर्व जबाबदारी शाळेवर असल्याने त्याची भीती होती. कधी मुले आजारी पडली तर त्यांना डॉक्टर कडे घेऊन जाणे हे अवघड काम होते. कारण गावापासून दूर असलेली शाळा. मुलांना उचलून घेऊन जाणे एवढा एकच पर्याय असे आणि तोच स्वीकारून चालत जाऊन उपचार करत असे. त्यामुळे ठरून एक दोनचाकी वाहन घेतले कारण दुसरा काही पर्याय नव्हता. कारण प्रवासासाठी दुसरी काही व्यवस्था ही नव्हती आणि  साधने ही कमी होती. डॉक्टर ही सहकार्य करत असे आणि मुलांना समजून घेत आणि त्यांची फी देखील घेत नसे हे त्यांचे मोठेपण म्हणावे लागेल.

         दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत काही पालक मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी येत नसे हे पाहून वाईट वाटे मुलंही एकटी पडे हे प्रसंग येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत असे पण पालकांनी कधी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलेच नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.

       एकदा तर पावसामुळे ज्या ठिकाणी मुले राहत त्या हॉल ची व आम्ही राहत होतो त्या घरावरची वाऱ्याच्या हवेने पत्रे उडून गेले. त्यात मोठा पाऊस, भयाण रात्र आणि आम्ही सर्व त्या रात्री अखंड भिजत, उभे राहून रात्र काढली मुले रडत होती त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे पावसाच्या पाण्यात वाहत होती… मला असे वाटते की त्या रात्री पावसाचे पाणी ही खारट झाले असेल.! असे मॅडम यांनी सांगितले.

त्यांच्या जीवन प्रवास मतिमंद मुलांच्या आयुष्याशी खर्ची केला आणि एक समाज उभा करण्यासाठी अपार कष्ट केले. पंचाकृशितील नागरिकांना सोडून हे कदाचित कोणाला माहीत नसेल कारण त्यांनी कधी या गोष्टीचा बाऊ केला नाही किव्हा जाहिरात केली नाही कारण निस्वार्थी सेवा हा त्यांचा पाया आहे आणि होता…..

लेखक
मोहन गोळे