ऑनलाईन पत्रकारिता म्हणजे विशिष्ट तंत्राचा
सॉफ्टवेअरचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ बातमी
प्रसारित करणे व वेब पोर्टल वर माहिती
साठवणे व विविध ॲप वर पाठवणे म्हणजे ऑनलाइन पत्रकारिता होय.
माहिती पाठवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मोठ्या प्रमाणात ई-मेलचा वापर माहिती जलद पद्धतीने न्यूज रूम किंवा वृत्तसंस्था यांना पाठविले जाते यामुळे कामकाज जलद पद्धतीने होण्यास मदत होते व माहिती संकलन ही खूप जास्त होते.
वैशिष्ट्ये-
१.जग जवळ आले आहे – नेटवर्कच्या माध्यमातून विशेष करून मोबाईल
संगणक यांच्या वापरा व त्याच्या जोडीला इंटरनेट हे तांत्रिकदृष्ट्या जवळ आल्याने
माहितीचे आदान-प्रदान खूप मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यात काही घटना
घडल्यास ती तत्काळ या सर्व माध्यमातून प्रसारित झाल्याने ती घटना देशाबाहेरच्या
असेल तरी पण जलद गतीने प्राप्त होते.
त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून जग हे जवळ अति जवळ आली आहे.
२. दोन्ही बाजूंनी संवाद ( टू वे कमुनिकेशन) – मुख्य करून मोबाईल डिव्हाईस व संगणक यांचा वापर ऑनलाइन पत्रकारितेमध्ये केला जातो. असे असल्याने दोन्ही बाजूने संवाद हा होत असतो. कोण हि बातमी प्रसारित केल्या नंतर त्याच्यावर फीडबॅक किंवा प्रतिक्रिया ही जलद गतीने मिळते. त्यामुळे हे टू वे कमुनिकेशन होत आहे. टू वे कमुनिकेशन मुळे त्या बातमीचा नक्की काय प्रभाव जनसामान्यांवर पडतो हे तत्काळ समजून येते. त्यामुळे ऑनलाईन पत्रकारिता ही अधिकाधिक प्रभावी व पारदर्शी होत आहे.
3.
मल्टिमीडिया स्टोरी टेलिंग- विविध विषयांवर ते स्टोरी व्हिडिओ, ऑडिओ, व इमेज या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे
प्रसारित किवा प्रसारण केल्याने माहिती श्रोत्यांपर्यंत तत्काळ व समजण्याजोगी
मिळते. स्टोरी साठी ही मल्टिमीडिया चा
वापर केल्याने वाचकाला श्रोत्याला मनाला भावणारी व पटणारी होते. त्यामुळे ऑनलाइन पत्रकारिता प्रभावी ठरते.
४.
आभासी / वरचुअल – ऑनलाईन पत्रकारितेमुळे ग्राफिक इमेजेस तसेच
व्हिडिओ यांचा वापर केल्याने बातमीही प्रभावी ठरते. प्रत्यक्ष जरी त्या पद्धतीने नसेल तरीही ती
दिसते. आभासी असते परंतु श्रोत्यांना
ती आवडते.
आपण जीवनाचा प्रवास करत असताना किती बदल होत आहेत. हे पाहतो किती तरी नवीन गोष्टी येतात आणि किती तरी जुन्या गोष्टी आपल्या समोर पुढे नव्याने उभ्या राहतात. त्या मध्ये कपड्यांच्या रचना, केसांची रचना किंवा विविध व्यसन करण्याची पद्धत. कपडे किंवा इतर विषय समजू शकतो, पण व्यसन करण्याची पद्धत हे थोडे चुकीचे वाटते ना? पण हे खरे आहे. नव्याने पुन्हा आपल्यात सहभागी झाला तो म्हणजे हुक्का.
या घडीला व्यसन करण्याचे वेगवेगळे प्रयोग आपल्यापुढे येत आहे. जुने ते सोने असे म्हणत हुक्का आपल्यासमोर आहे. आणि त्यात नवीन पिढी ही हे काही नवीन आहे. म्हणून त्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. काही राजा – महाराज (छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना सोडून) यांच्या बऱ्याच चित्रांमधून, चित्रपटामधून आपल्यापुढे हुक्का येतो. त्यामुळे त्याला राजाश्रय व श्रीमंतीचे प्रतीक असा गोड भास होतो. त्याचा फायदा हॉटेल व्यवसायिक किंवा हुक्का पार्लर यांनी करून घेतला. व नव्या पिढीला नवीन व्यसना चा मार्ग दिला.
किती तरी मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर पुणे आणि परिसरामध्ये सुरू आहे. हे आपण पाहतो आहे. काही ठिकाणी पोलीस अधिकारी किंवा माझी सदनी अधिकारी यांची भागीदारी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हुक्का पार्लर बिनधास्तपणे सुरू केले आहे. असेच म्हणावे लागेल.
शाळा किंवा कॉलेजची मुले-मुली यांना याचे फार आकर्षण असल्याचे दिसते. त्यांना कल्पना नाही की ते नक्की कोणत्या दिशेने चालले आहेत. पुण्यामध्ये शिक्षणासाठी दुसऱ्या गावातून, शहरांमधून, इतर राज्यांमधून नव्हे नव्हे परदेशातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत ते यासाठी बळी पडत आहे. तसेच येथील युवक सुद्धा या मध्ये सामील होताना दिसत आहेत. आयटी मधील बक्कळ पगार घेऊन किंवा वडिलोपार्जित जमिनी विकून आयुष-आरामात आणि विविध व्यसने करण्यास भरपूर वेळ व भरपूर पैसा असे काही झाल्याने बिनधास्तपणे चालले आहे. परंतु या गोष्टीचा भविष्य काय परिणाम होईल याचे विवेचन न चिंता कोणी करत नाही हे मात्र खरे.
हॉटेल व्यवसायिक किंवा हुक्का पार्लर व्यवसायिक यांना नवीन पिढीचे काही देणे घेणे नाही, असे म्हणावे लागेल. त्यांना हुक्क्या मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा दिसत असल्याने तसेच कोणी अधिकारी भागीदार असल्याने व्यवसाय मुक्तपणे व बिनदिक्कतपणे सुरू केले आहे. या पैशातून मोठ्या गाड्या, बंगले, परदेशी वाऱ्या, सदस्य ते सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधील पदे मिळविण्यासाठी मुबलक पैसा उभा राहत आहे. तो ही अतिजलद पण त्याचा समाजावर काय परिणाम होत आहे. तसेच त्याच्या स्वतःच्या परिवारावर काय परिणाम होत आहे. याचा विचार जरासुद्धा हे व्यवसायिक करत नाही.
‘जे पेरले तेच आणि तेच उगवते’ या उक्तीप्रमाणे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी कोणत्या प्रकारचा व्यवसाय करून पैसे जमा केले आहे व त्याचा वापर पुढची पिढी कशी करेल हे समजून घेतला तर मोठा अनर्थ टाळू शकतो.
‘निसर्गाचा नियम कोणासाठी बदलत नाही’ हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखे आहे.
गुजरात राज्यानंतर महाराष्ट्रामध्ये सिगारेट आणि तंबाखू उत्पादनात संदर्भीय अधिनियम 2003 नुसार हुक्का बंदी घातली आहे. म्हणजे भारत देशातील महाराष्ट्र हे राज्य या बाबतीत निर्णय घेणारे दोन नंबरचे राज्य म्हणावे लागेल. पण सर्वोच्च न्यायालयाने असे म्हंटले की सिगारेट आणि तंबाखू उत्पादन अधिनियम या मध्ये हुक्क्याचा किंवा अशा वाक्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने हुक्का पार्लर बंदी घालता येणार नाही. याचा गैरफायदा घेऊन राजरोसपणे हुक्का पार्लर सुरू आहे.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून हुक्का या विषयावर आपली भूमिका काय आहे. राजरोसपणे उघड्या डोळ्याने हे पहात राहायचे का? युवा अवस्थेत नव्याने प्रवेश करणारी मुले मुली या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यात काही दिवसांनी आपली मुले दिसतील त्यावेळेस आपला आपल्याला धक्का बसू नये एवढे झाले म्हणजे जीवन सार्थक म्हणावे लागेल. यासाठी सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. तसेच सर्वांनी पुढाकार घ्यावा लागेल.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आपण ऐकले असेल, चित्रपटामध्ये पाहिले असेल किंवा चित्र वाहिनी मध्ये मालिकांमधून आपण त्यांना व त्यांच्या जीवन प्रवास पाहत आलो आहे. यामध्ये कधी चुकूनही चुकीचे प्रसंग पाहण्यात व वाचनात आले नाही. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न पडणे गरजेचे आहे. आपण या महान व्यक्तींच्या सहवासात असताना असे काही पाहिले नाही. ना वाचले मंग आपण शिवरायांचे मावळे हे कसे पाहू शकतो. त्यासाठी छत्रपतींचे स्मरण करून अशा कृत्यांचा विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे. व समाज जागृत करणे हा उद्देश असावा.
सामाजिक क्षेत्रात खूप मोठी मोठी माणसे काम करत आहेत. आणि सामाजिक दायित्व निभावत आहे त्या मध्ये प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ, अभय बंग, मोहन धारिया, अण्णा हजारे, पोपटराव पवार, मेधा पाटकर, विनोबा भावे, कै. गोविंद पानसरे डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रतिभा केंजळ व ईतर ही खूप महत्वाच्या व्यक्तीनी आपले योगदान या क्षेत्रात दिले त्यांच्या शिवाय हा सूज्ञ समाज निर्माण होऊ शकल्या नसता. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आणि क्षेत्र ही आगदी वेगळे पण प्रामाणिक पणे समजाची सेवा हा मुख्य उद्देश या सर्वांपुढे आहे आणि असतो या सर्वांना कोठून ऐवडी शमता आणि उत्साह मिळतो हे समजत नाही हे कबूल केले पाहिजे.. कदाचित या सारखी व्यक्ती देवच वाटते.
मी या सर्व व्यक्ती च्यां बद्दल काय काय लिहावे असे होते पण माझा अभ्यास निच्छित कमीच पडेल हे मात्र नक्की पण म्हणून मी माझ्या समोर असणाऱ्या आणि त्यांचा प्रवास काही वर्ष तरी मी पाहिलं अश्या केंजळे परिवार विषयी लिहण्याची ठरवले त्या साठी 2013 सालच्या लोकमत मधील लेखाचा असरा घ्यावा लागला परंतु त्या ही पलीकडले म्हणजे त्यांना मी प्रत्यक्ष पाहिले असल्याने मला त्यांच्या त्याग आणि अपार कष्ट डोळ्या समोर उभे राहते म्हणून हा लेख लिहण्यासाठी घेतला.
केंजळेसर परिवार पिरंगुट मध्ये राहण्यास आले सर शिक्षक होते. त्यामुळे ते आले असावेत त्यावेळी शिक्षक हे ज्या शाळेत शिकवत त्या भागात राहत असे. त्या कारणाने ते स्थाईक झाले असे म्हणण्यास काही हरकत नाही. त्यांना एक मतिमंद मुलगा होता. त्याच्या शिक्षणासाठी परत पुण्यात जाणे शक्य नव्हते आणि पुण्यात फक्त 'कामायनी' शाळा होती. जी मतिमंद मुलांना शिकवत होती. पण हा रोजचा प्रवास शक्य नव्हतं आणि त्या वेळी प्रवास करण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा सरकारी एस. टी. हे वाहन येत असे, खाजगी वाहनांचा प्रश्नच नव्हता. त्या मुळे मुलाला घरी शिकवणे हा एकाच मार्ग त्यांच्या कडे होता. या एका कारणाने मॅडम च्या मनात आले कि या ग्रामीण भागासाठी मतिमंद मुलांसाठी शाळा का सुरु करू नये. सौ. केंजळे मॅडम यांनी त्यांच्या लेखात सांगितले आहे.
१९८४ सली सुरू झाली मतिमंद मुलाची निवासी शाळा. ठिकाण राहते घर त्या वर्षी पाच विद्यार्थी यांनी प्रवेश केला पण घर गावात असल्याने शेजारी व गावातील परिवार यांना त्रास होणार ! कारण मुले मतिमंद..! त्याना संभाळने .. त्यांचा गोंधळ..! कोणाला त्रास होऊ नये या कारणाने. जवळच्या माळावर शाळा स्थलांतरित करावी असे ठरवले आणि जागा शोधून शाळा तिकडे हलवली जागा जिथे मिळाली तेथे जवळपास कोणी नाही मोकळे रान जाण्यायेण्या साठी सरकारी पांधन ती ही पावसात पूर्ण बंद असे. असले तरी मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू करणे हे एकमेव ध्येय आलेल्या केंजळे परिवाराने जागा घेऊन शाळा सुरू झाली.
शाळा तर सुरू झाली एक खोली एक छोटे शेड. मुलांना सांभाळण्यासाठी गावच्या जवळील काही मंडळी. अधिकचे विद्यार्थी ही प्रवेशासाठी येत होते. कोणाला नाही कसे म्हणावे हा प्रश्न मॅडम ला नक्की पडला असेल त्या आर्थिक बाजू आणि हे मोठे होत असलेले कुटुंब सगळे सांभाळणे अवघड होत होते कारण आणि उत्पन्नाचे साधन म्हणजे केंजळे सरां ची नोकरी त्यावर तर सगळे चाले पण विद्यार्थी मतिमंद आणि रहिवाशी शाळा त्यामुळे जबाबदारी मोठी होती. त्या कारणाने सरांनी नोकरी सोडून पूर्ण लक्ष शाळेत घातले पण मॅडम शाळेचे सर्व पाहत असल्याने सरांनी शाळेसाठी परवानगी आणि निधी मिळवणे ही जबाबदारी स्वीकारली. मुलांकडे लक्ष देणे आणि त्यांना शिकवणे हे कार्य अखंड पणे दोन्ही उभयतांनी स्वीकारली.
मतिमंद मुले असल्याने शाळा सोडून रात्री आपरात्री पळून जात त्या मुळे रात्र-रात्र धावपळ करून मुलांना शोधणे आणि शाळेत असणाऱ्या मुलांना राखून ठेवणे हे काम निरंतर चाले मुलाची सर्व जबाबदारी शाळेवर असल्याने त्याची भीती होती. कधी मुले आजारी पडली तर त्यांना डॉक्टर कडे घेऊन जाणे हे अवघड काम होते. कारण गावापासून दूर असलेली शाळा. मुलांना उचलून घेऊन जाणे एवढा एकच पर्याय असे आणि तोच स्वीकारून चालत जाऊन उपचार करत असे. त्यामुळे ठरून एक दोनचाकी वाहन घेतले कारण दुसरा काही पर्याय नव्हता. कारण प्रवासासाठी दुसरी काही व्यवस्था ही नव्हती आणि साधने ही कमी होती. डॉक्टर ही सहकार्य करत असे आणि मुलांना समजून घेत आणि त्यांची फी देखील घेत नसे हे त्यांचे मोठेपण म्हणावे लागेल.
दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत काही पालक मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी येत नसे हे पाहून वाईट वाटे मुलंही एकटी पडे हे प्रसंग येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत असे पण पालकांनी कधी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलेच नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.
एकदा तर पावसामुळे ज्या ठिकाणी मुले राहत त्या हॉल ची व आम्ही राहत होतो त्या घरावरची वाऱ्याच्या हवेने पत्रे उडून गेले. त्यात मोठा पाऊस, भयाण रात्र आणि आम्ही सर्व त्या रात्री अखंड भिजत, उभे राहून रात्र काढली मुले रडत होती त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे पावसाच्या पाण्यात वाहत होती… मला असे वाटते की त्या रात्री पावसाचे पाणी ही खारट झाले असेल.! असे मॅडम यांनी सांगितले.
त्यांच्या जीवन प्रवास मतिमंद मुलांच्या आयुष्याशी खर्ची केला आणि एक समाज उभा करण्यासाठी अपार कष्ट केले. पंचाकृशितील नागरिकांना सोडून हे कदाचित कोणाला माहीत नसेल कारण त्यांनी कधी या गोष्टीचा बाऊ केला नाही किव्हा जाहिरात केली नाही कारण निस्वार्थी सेवा हा त्यांचा पाया आहे आणि होता…..
निवडणूका होत असताना नवमाध्यमांतील उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. माध्यमे ही प्रचार करणारी यंत्रणा म्हणून पुढे येत असल्याचे दिसून येते, त्यामुळे माध्यमांना विविध प्रकारचे दबाव येतात. माध्यमांवर विविध प्रकारच्या राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी जाहिराती प्रसारित करत असता. त्यामुळे माध्यमांना उत्पन्न मिळत आहे. असे असल्याने लोकसभा निवडणुकांमध्ये विशिष्ट पक्षाचा किंवा व्यक्तीचा अजेंडा राबवताना माध्यमे दिसतात आहे. असे असल्याने लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन करताना नैतिक मुल्यांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.
ज्या प्रमाणे माध्यमे आत्तापर्यंत कामे करत होती त्याचप्रमाणे नवमाध्यमे ही लोकसभा निवडणुकीच्या काळात कामे करताना दिसत आहे. बदलणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक व ऑनलाइन माध्यमातून वाचकांचे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे नव माध्यमांना निवडणुकीच्या काळात विविध प्रकारची बंधने व बातमीचे होणारा परिणाम हा लक्षात घेऊन बातमी द्यावी लागते किवा करावी लागते.
नवमाध्यमांना खालील प्रमाणे काळजी घ्यावी लागते.
१. बातमी हि निरपेक्ष असावी.
२. जाती – धर्म यांचा विचार करून बातमीची भूमिका असावी. सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
३. आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता बातमी असावी.
४. पक्षाच्या विचारणा किवा एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाला बळी न पडता बातमी असावी.
५. सत्य परिस्थिती दर्शवणारी बातमी असावी.
६. ऐकीव माहितीवर बातमी नसावी, सत्यता पडताळून किवा प्रत्यक्ष झालेल्या घटनेवर बातमी असावी.
७. बातमीचे तथ्य जाणून घेऊन बातमी करावी.
८. आरोप-प्रत्यारोप ह्याची माहिती घेऊन बातमी असावी,खरच एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती वर आरोप केले आहेत का ह्याची तपासणी करून बातमी तयार करावी.
९. व्यक्ती किवा नेत्याच्या उमेदवाराच्या वैयक्तिक जीवनावर प्रभावित असणारी बातमी नसावी. खाजगी जीवनावर प्रभाव पडेल किवा चुकीची माहिती प्रसारित होईल ह्याची काळजी घ्यावी
१०. बातमी-दारी करताना नेता किवा उमेदवार त्याचा प्रचार करण्यासाठी बातमीचा उपयोग करून घेत आहेका याचा विचार करणे गरजेचे आहे.
११.आर्थिक देण्या-घेण्यावरून किवा प्रेम पोटी बातमी नसावी.
१२.बातमी मध्ये सर्वच आदर असावा उगाच कोणा व्यक्तीला किवा पक्षाला जुकते माप देऊ नये.
१३. बातमी मध्ये कोणाचा प्रचार नसावा किवा प्रपोगंडा चालू नये किवा बळी पडू नये.
१५. बातमीची चव वाढावी म्हणून मिट-मिरची लाऊन बातमी नसावी जे असेन ते स्पष्ट आणि सोप्या भाषेत असावे.
१६. बातमी ही निरपेक्ष, निरव्याक्ती, निपक्षी व समजासाठी दिशा व सत्य व प्रामाणिक असावी.
ह्या प्रमाणे लोकसभेचे वार्तांकन करताना नवमाध्यमांनी काळजी घ्यावी.
बातमी
बारामती कोणाची ?
पिरंगुट ता. २९ : बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान २३ एप्रिल झाले,परंतु प्रचार इतकी चर्चा बारामती कोणाची या विषयाची झाली. कमी झालेले मतदान, जोरदार प्रचार, नेते व त्याच्या वल्गना या मुळे कोणाचा विजय होईल या विषयी उत्सुकता बारामती मतदार संघात आहे.
भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा प्रबळ उमेदवार दिल्याने मोठे आव्हान राष्ट्रवादी पुढे निर्माण झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी च्या उमेदवार या पूर्वी दोन वेळा प्रचंड मतांनी विजयी झाल्या होत्या. सन. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असून सुद्धा त्यांनी विजय संपादन केला होता. तसेच अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या मोठ्या सभा झाल्या व प्रत्यक्ष अजित पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना दूरध्वनी वरून संपर्क केल्याने कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून आले. तसा हा मतदार संघ शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. त्या मुळे येथील निवडणूक हि तेवढी प्रतिष्ठेची झाली.असे या वेळी दिसून आले.
भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा स्थानिक असणाऱ्या कांचन कुल यांना उमेदवारी दिली. या मतदार संघासाठी पक्षाच्या दिग्गज व्यक्ती यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली. मंत्री चंद्रकांत पाटील हे या मतदार संघात तळ ठोकून होते. संघ कार्यकर्त्यांनी १०० % प्रचारात सहभाग घेतला. तसेच नरेंद्र मोदी, अमित शहा, उद्धव ठाकरे व देवेन्द्र फडणवीस यांनी पुणे व बारामती परिसरात मोठ्या सभा घेतल्या. याचा परिणाम हा मतावर होताना दिसला पक्षाचे कार्यकर्ते व संघ कार्यकर्ते १०० % मतदान होण्या साठी व त्या अनुषंगाने भाजपा चा प्रचार केला. परंतु मतदान हे कमी झाल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून आले.
बारामती लोकसभा मतदार संघामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर हे विधानसभा येतात या मध्ये पक्षाची ताकद हि बरोबरीची आहे असे जाणकारांचे मत आहे. बारामती, इंदापूर व भोर हे राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या कडे आहे. खडकवासला, पुरंदर व दौंड भाजपा, शिवसेना व रसपा यांच्या कडे आहे. त्या मुळे हि लढत तुल्यबळ आहे. त्याचा प्रमाणे भोरचे आमदार व इंदापूरचे मा.आमदार हे कॉंग्रेस चे असल्याने त्यांनी नक्की काय भूमिका घेतली ह्या विषयी गुड निर्माण झाल्याने लढती मध्ये कोण विजयी होईल हा प्रश्न दोनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतावतो आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एक हि उमेदवार नसताना पुणे परिसरात राज ठाकरे यांनी मोदी व शहा यांच्या विरोधात घेतलेली सभा हि महत्वाची घटना मानली जाते. मनसे यांचे या मतदार संघात युवक संघटन व मतदार संख्या मोठी आहे. त्या मुळे राष्ट्रवादी ला जमेची बाजू झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
बारामती लोकसभा मतदार संघ हा नक्की कोणाकडे राहतो आहे हे येणाऱ्या २३ मे ला समजेन परंतु हि निवडणूक राष्ट्रवादी पक्षाला प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरली.
फिडबॅक म्हणजे माध्यमांद्वारे प्रसारीत
होणाऱ्या बातमी बाबत वाचकांकडून प्रति उत्तर किंवा त्या बातमी बाबत चे मत किंवा
प्रतिक्रिया म्हणजे फिडबॅक होय.
नवमाध्यमांना हे खऱ्या अर्थाने वाचक व माध्यमे
यांच्यामध्ये संपर्काचा मोठा दुवा आहे.
पारंपारीक माध्यमांना फिडबॅक मिळवले हे
अवघड होते समाज मनावर काय परिणाम होतो आहे ते समजणे पारंपारीक माध्यमांना शक्य होत
नसल्याने वाचकांना नक्की कोणती बातमी हवी आहे त्यावर प्रतिक्रिया काय आहे हे समजत
नसे त्यामुळे पारंपारीक माध्यमांमध्ये सर्व प्रकारच्या बातम्या वाचकांन पर्यंत
पोचवाव्या लागत असे वाचकांची पसंती हे अधोरेखीत होतं नसे त्यामुळे नवमाध्यम हे
वाचकांच्या प्रति अग्रगण्य भूमिका घेताना दिसत आहे.
नवमाध्यमां मध्ये फिडबॅक चा वापर होऊ
लागल्याने वाचकाला आवडणारी बातमी व त्यावर त्याच्या प्रतिक्रिया हि त्वरीत मिळत
असल्याचे दिसते आहे.यामुळे बातमी चे महत्व खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे.
दिवसेंदिवस नवनवीन एप्लिकेशन व पोर्टल व
पारंपारीक माध्यमांचे नूतनीकरणकडे वाढलेला कल नवमाध्यमांतील नांदी म्हणावी लागेल, माध्यमांमुळे बातमीचा
फिडबॅक मिळणे हे महत्व पूर्ण काम होत आहे. बातमी व तिचे काय परिणाम होतो हे
समजण्यास मदत होत आहे. बातमीचे स्वरूप व स्पष्टीकरण वाचकांना आवडेल किंवा नाही
आवडले हे त्वरीत माहित होऊ शकते याचा उपयोग वाचकांची आवड काय आहे हे समजते
त्यानुसारच वाचकाला बातमी पाठवली जाऊ शकते.
पुढील प्रमाणे महत्व पूर्ण घटक सांगता येतील
1. फिडबॅक देणे घेणे सहज शक्य झाले वाचकांची पसंती समजणे सोपे झाले.
2. हि माध्यमे ऑनलाइन असल्याने फिडबॅक देणे-घेणे व कोणत्याही ठिकाणावरून
सोपे शक्य झाले आहे.
3. वाचकाचा फिडबॅक माध्यमांना मोजता येतो त्यामुळे वाचकांची पसंती व
टीकाटिपणी वाचकाला काय हवे काय नको हे समजते तसेच फिडबॅक मोजता येते त्यानुसार
माध्यमांना काम करण्यास मदत होते.
4. फिडबॅक साठी खर्च खूप कमी प्रमाणात येतो ऑनलाइन पद्धतीमुळे एखादी
लिंक किंवा एसएमएस चा वापर करून कमी खर्चात फीडबॅक देता येतो खर्च कमी असल्याने
उपयुक्तता हि जास्त झाली आहे.
नवमाध्यमांचा पारंपारीक माध्यमांवर होणारा
परिणाम खालील प्रमाणे सांगता येईल.
1. पारंपारीक माध्यमांवरील वाचकांच्या संख्येत घट निर्माण झाली आहे वाचक
हे नावमाध्यमांकडे वळल्याने वाचक कमी होत आहे.
2. आर्थिक अडचणी निर्माण होत आहे. काही प्रमाणात पारंपारिक माध्यमे म्हणजे
पेपर मीडिया त्यावर मोठा परिणाम होत आहे. वाचक नवमाध्यमांचा वापर करत असल्याने
पारंपारिक माध्यमांकडे दुर्लक्षित झाला आहे. त्यामुळे आर्थिक प्रश्न पारंपारिक
माध्यमांकडे वाढत आहे.
3. पारंपारिक माध्यमाद्वारे ठराविक वेळेत बातम्या ऐकणे किंवा वाचायला
मिळणे हे होत होते. परंतु वाचकाला बातमी कोठेही, कधीही कोणत्याही
वेळात वाचायला मिळते त्यामुळे पारंपारिक माध्यमांचा वापर कमी झाला आहे.
4. पारंपारीक माध्यमांवर ही बदलाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपारीक
माध्यमे ऑनलाइन पोर्टलवर येत आहे. त्यामुळे वाचकांना पारंपारीक माध्यम वरील लेख
वाचायला मिळताना दिसत आहे.
नवा माध्यमांचे भविष्य पुढीलप्रमाणे
मांडता येईल.
1. इलेक्ट्रॉनिक माध्यमे व ऑनलाइन पोर्टल यांची व्यवस्थितपणे सांगड
झाल्याने नवमाध्यमांतील मोठ्या प्रमाणामध्ये उदय झाला. त्यामुळे वाचकांची संख्या
हे वाढत झाली आहे.
2. विविध प्रकारच्या बातम्या कमीतकमी वेळात पोचवण्याचे काम नवमाध्यमे
करत आहे. वाचकाला त्वरीत बातमी मिळते त्यामुळे नवमाध्यमांतीचा वापर हा मोठ्या
प्रमाणात होत आहे.
3. बातमीची सत्यता अधोरेखीत होत नाही त्यामुळे गैरसमज, गैरप्रकार होण्यास
चालना मिळते आहे. या मुळे नवमाध्यमांना विश्वासार्हता संपादन करणे गरजेचे आहे.
4. नवमाध्यमांतीचा वाचक वाढत असलेले आर्थिक गणितही मोठ्या प्रमाणात होत
आहे. या मुळे आर्थिक उन्नती होण्यास मदत होत आहे.
5. मोबाईल फोन चा वापर ज्यास्त होत आहे व हे प्रमाण अधिक वाढत जात आहे
त्या मुळे नवमाध्यमांचा वाचक वाढणारे असून त्याचा फायदा नवमाध्यमांना होणार
असल्याचे दिसून येत.
समाजमनावर होणारे परिणाम पुढील प्रमाणे
सांगता येतील.
1.तत्काळ कोणतीही शहानिशा न करता बातमी प्रसारीत केल्याने
तेढ निर्माण होत आहे.
2.विश्वासार्हता कमी.
3.समाजामध्ये दुर्वीकरण
होण्यास मदत.
4.सत्यता न जाणता चुकीच्या
माहिती वरून बातम्या प्रसारीत केल्या जातात त्यामुळे सत्या पासून वाचक दूर जाताना
दिसत आहे.
5.आर्थिक व सामाजिकदृष्ट्या
प्रगतीसाठी विशिष्ट प्रपोगंडा तयार करून वाचकांवरती त्याचा परिणाम होत असल्याचे
दिसत आहे.
6.विविध चित्रे व्हिडिओ
द्वारे चुकीचे संदेश प्रसारीत होत असल्याने सामाजिकदृष्ट्या सलोका बिघडल्याचे दिसत
आहे.
7.नवमाध्यमांचा वापर चुकीची
माहिती प्रसारीत करुन एखाद्या विशिष्ट व्यक्तीला समाजामध्ये चांगली, योग्य असल्याचे भासवण्यासीठी वापरले जाते आहे.
8.नवमाध्यमांतीने माहिती
चुकीची पसरवली असता त्याचा परिणाम समाज मनावर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये व जलदगती
होत आहे. अश्या माहितीमुळे वाचकांची मते टोकाची झाल्याचे दिसत आहे.
9.नवमाध्यमाध्वारे माहिती
वाचकाला सत्य वाटते व त्या वरून त्याचे मते तयार करत असतो त्यामुळे कोणतीही बातमी
व तिची सत्यता पडताळणी अवघडच झाले आहे. चुकीच्या माहिती वरून
वाचकांचे मते तयार झाल्यास त्याचा समाजावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे नवमाध्यमांन
वर विश्वास ठेवावा का हा प्रश्न निर्माण होतो.
ऑनलाइन पत्रकारितेमध्ये पत्रकार म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी लागते.
1.
शब्दसंख्या – वाचक हे मोबाईल किंवा
संगणकावर बातम्या वाचत असतात किंवा पाहत असतात.
वाचक किंवा श्रोता हा कमी वेळामध्ये खूप साऱ्या बातम्या पाहत असतो त्यामुळे
पत्रकाराने शब्दसंख्या तिचा विचार करणे गरजेचे असते. कमी शब्दांमध्ये
श्रोत्यात वाचकास बातमी संपूर्ण समजावी असे असते.
त्यामुळे शब्दसंख्या ही मर्यादित असावी.
2. छोटी वाक्य-
ऑनलाइनच्या माध्यमातून वाचक कमी वेळात खुप सारे काम करत असतो. त्यामुळे
त्याच्याकडे वेळ हा ही तितकाच कमी असतो. पत्रकार यांनी विचारकरून बातमी लिहिताना छोट्या वाक्यांचा
वापर करणे गरजेचे आहे.
3. सोपी भाषा-
शब्दसंख्या, छोटी
वाक्य तसेच सोपी भाषा ही ही खूप महत्त्वाचे आहे.
वाचक श्रोता हा कमी वेळामध्ये खूप साऱ्या बातम्या वाचत असतोअसतो. त्यामुळे त्याला भाषण ही अवघड न वाटता सोपी व
समजेल अशी असल्यास बातमी संपूर्ण वाचली
जाते.
4. वाचकाच्या दृष्टिकोनाला
महत्त्व- इंटरनेट वापर करणारा हा उच्चशिक्षित व
तंत्रज्ञानाचे व ऑनलाइन बाबत ओळख असणारा असतो. त्यामुळे वाचक सुज्ञ असल्याने बातमी
ही वाचकाच्या दृष्टिकोनातून असावी. तसेच
बातमी हे वृत्तपत्र संस्था किंवा वृत्तपत्रांमध्ये ज्या पद्धतीने लिहिली जाते तशी
ऑनलाइन पत्रकारितेमध्ये लिहिली जात नाही. वाचकाच्या दृष्टिकोनाला महत्त्व दिले
जाते.
5. लक्षवेधी हेडलाईन-
वाचकाला आवडणारी व प्रभावित करणारी हेडलाईन्स आकर्षित करते. त्यामुळे लक्षवेधी हेडलाईन असणे आवश्यक
आहे. त्यामुळे सदर बातमी वाचली जाते.
6. बातमी संपल्यानंतर विविध बातम्यांचे लिंक-
पत्रकार ही त्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्याखाली विविध इतर बातम्यांच्या
लिंक शेअर करत असतो. जेणेकरून त्याने त्या पोर्टलवर जास्त वेळ वावर करावा. म्हणून
असे होत असल्याने विविध बातम्या वाचल्या जातात व वेब पोर्टल वरती वाचक हा
स्थिरावतो.
7. पहिला पॅरेग्राफ महत्त्वपूर्ण- पत्रकारितेमध्ये पहिला पॅरेग्राफ हा महत्त्वाचा
असतो. त्याचप्रमाणे ऑनलाइन पत्रकारितेमध्ये ही पहिल्या पॅरेग्राफ ला महत्त्व आहे.
साधारणता ऑनलाइन बातमीमध्ये पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तिन पेक्षा जास्त वाक्य
नसतात.
8. रंगसंगती- बातमी मध्ये रंगसंगती उत्तम असल्याने वाचकास
पसंत पडते. त्याच बरोबर वेबसाइट/ वेब पोर्टलचा लोगो हा ही तितकाच महत्त्वाचा ठरतो.
9. उत्तम फॉन्ट चा वापर- फॉन्ट चा वापर हा चांगला व आकर्षक असल्यास वाचक हा बातमी वाचत असतो. बातमी च्या फॉन्ट वरून बातमी ज्यास्त वाचली जाते. त्याचप्रमाणे विशिष्ट ठिकाणी बोल्ड व कलर्स चा वापर केल्याने बातमी वाचकास प्रभावीत करते.
वेब संपादकाची कार्य- वेब संपादक वेब पोर्टल
तसेच वेबसाईट यांच्यावरती लिखित होणाऱ्या बातम्या पुनर्लेखन व्याकरण व इतर सर्व
बाबी त विचार करून वेब पोर्टलवर बातमी प्रसारित करीत असतो. तसेच बातमीही सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे का? हे पाहून बातमी प्रसारित करतो.
1.
बातमीच्या चुका दुरुस्ती करणे- ऑनलाइन पत्रकार ही
बातमी संपादकास मिळाल्यानंतर त्यावर संस्कार करतो. त्या बातमी मधील चुका दुरुस्त करतो. बातमी पुनर्लिखित करतो. बातमी योग्य पद्धतीने व
सोप्या शब्दात लिखित करतो.
2.
बातमीची सत्यता पडताळणी- पत्रकाराने बातमी
पाठवल्यानंतर त्या बातमीचे पडताळणी करत असतो. त्या बातमीचे सत्य-असत्य पडताळत
असतो. त्याचप्रमाणे ती बातमी योग्य का? हे पाहत
असतो. बातमी सामाजिक तेढ निर्माण करणारी
असल्यास ती प्रसारित करीत नाही.
3. आकडेवारी तपासणी-
विविध वर लिखाण करत असताना. आर्थिक किंवा आकडेमोड केली जाते. त्याकडे मोड योग्य आहे
का?
ह्याची शहानिषा करण्याचे काम संपादक करत असतो. त्यामुळे आकडेवारी
चुकू नये व त्याचा परिणाम हा चुकीचा होऊ नये म्हणून आकडेवारी तपासण्याचे काम
संपादक करतो.
4. बातमीचा सोर्स- पत्रकार हा बातमी वेब पोर्टल ला पाठवल्यानंतर
त्याचे काम संपते परंतु वेब संपादक ती बातमी योग्य आहे का? पडताळणी करत असतो. तो विविध सोर्स
वापरून बातमीची सत्यता पडताळणी करत असतो.
व बातमी ही योग्यरीत्या पुनर्लिखित करतो.
विविध व्यक्ती, संस्था, परिचित
पत्रकार यांच्याकडून त्या बातमीसंदर्भात माहिती गोळा करून बातमी उत्तम तयार
करून प्रसारित करतो.
5. पोर्टल ची
शैली- बेब
पोर्टल ची शैली एक विशिष्ट प्रकारची असते.
त्या पद्धतीमध्येच पोर्टल हे
बातम्या प्रसारित करत असते. कोणत्या शब्द
असावेत कोणते शब्दां नसावेत ह्याबाबत
काळजी घेतली जाते. तसेच वेब
पोर्टलवर बातमी व त्यावरील फोटो हे योग्य आहे का? याचाही
प्रामुख्याने विचार केला जातो. बहुतांशी वेब पोर्टल हे वृत्तसंस्थेचे मालकीचे
असते. त्याची शैली ही जपली जाते.
6. शब्दमर्यादेचे पालन-
वाचता कमी वेळात जास्त बातम्या वाचत असतो. त्यामुळे शब्दसंख्या तिच्यावर नियंत्रण
ठेवण्याचे मुख्य काम संपादक करत असतो. साधारणपणे 150 शब्दांपर्यंत बातमी असते. बातमीचे विविध भाग करून त्यास वेगवेगळे हेडलाईन देऊन बातमी
वाचकांपर्यंत पोचवतो.
7. कन्टेन्ट-
बातमीही थोडक्यात असली तरी तिचा कन्टेन्ट हा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे
बातमी चा प्रभाव हा वाचका वरती पाडला जाऊ शकतो. असे असल्याने बातमी चा हा महत्वाचा
भाग समजून त्यावर वेब संपादक त्याचे काम करत असतो.